Skip to main content

तुझिये निढळीं...

हे संत ज्ञानदेवांचं भजन - तुझिये निढळीं...


एका प्रकट कार्यक्रमात बालगंधर्वांनी गायलेलं ध्वनिमुद्रण आहे हे. 

जुनं आणि प्रकट कार्यक्रमातलं असल्यामुळे फार चांगलं नाहीये. पण त्याच्या सगळ्या बाह्य दोषांतून आणि मर्यादांतूनही त्याचं सौंदर्य आणि त्याची शक्ती दोन्ही पूर्ण प्रकट होतात हा माझा अनुभव आहे. 

हे म्हणजे वेरूळच्या आजच्या भग्न मूर्तीकडे पाहावं आणि ती तिच्या मूळ स्वरूपात दिसावी तसं आहे थोडंसं... भगवंतांनी गीतेत म्हंटलं आहे - यः पश्यसि स पश्यसि - ज्याला दिसतं त्याला दिसतं.... तसं काहीसं. 

ही चाल मास्तरांची... मा. कृष्णरावांची... आहे. त्यांची स्वतःची या गाण्याची उत्तम ध्वनिमुद्रण असलेली ध्वनिमुद्रिका आहे. माझ्याकडे आहे.  छान आहे.  

पण हे ऐकल्यानंतर पुन्हा 'त्यांचं' ऐकावं अशी इच्छा मला झालेली नाही. 

संगीतकाराने स्वतः गायलेलं गाणं हे कोणत्याही गायकाने गायलेल्या आवृत्तीपेक्षा सरस असतं म्हणतात. शंभरातल्या नव्व्याण्णव वेळा ते खरंही आहे. पण काही गायकांच्या गळ्याला अद्भुताचा, परतत्त्वाचा स्पर्श असतो. त्यातून व्यक्त होणारा आवाज त्या स्पर्शामुळे एक वेगळी अनुभूती देऊन जातो. पंकज मलिकांनी संगीतबद्ध केलेली काही गीतही अशी त्यांच्या स्वतःच्या आवाजात उपलब्ध आहेत, आणि तीच कुंदनलाल सैगल यांनीही गायलेली आहेत.

उदाहरणार्थ... ऐ क़ातिब-ए-तक़दीर मुझे इतना बता दे

आणि स्वतः संगीतकार पंकज मलिक यांनी गायलेलं...

एका बाजूला कलेचा, निर्मितीचा दैवी स्रोत, आणि दुसरीकडे श्रोते, यांच्यामध्ये असलेला कलाकार. तो कलाकार जर पूर्णपणे अहंकारशून्य आणि अभिनिवेशविहीन झाला, तर जी कला श्रोत्यांपर्यंत पोहोचते, ती अत्यंत सात्त्विक असते अशी माझी धारणा आहे आणि अनुभवही आहे. 

प्रत्यक्ष ज्ञानदेवांच्या स्वतःच्या रचनांमध्ये हा अनुभव मला इतर कुठल्याही निर्मितीपेक्षा सर्वाधिक येतो. गाण्यामध्ये बालगंधर्व आणि कुंदनलाल सैगल इतकं यांच्याइतजे, याच्याजवळ जाऊ शकणारे दुसरे गायक सापडणं अवघड आहे. 

व्यक्त होण्याच्या या काळात, "स्वतःची अभिव्यक्ती" ही कलाकाराची शक्ती, प्रेरणा मानली जाणं स्वाभाविक आहे. त्यातून निर्माण होणारी कलाही श्रेष्ठ असू शकतेच. पण त्या कलेच्या निर्मितीसाठी, आणि तिच्या आस्वादासाठीही, बुद्धीचा, विचाराच, एक झिरझिरीत का होईना पदर असावाच लागतो. 

पण त्या निर्मितीमागे "व्यक्त होण्यापेक्षा" जर समर्पणाची भावना असेल, त्या अभिव्यक्तीच्या प्रेरणेमागे असलेला अहंकार जर पूर्णपणे विसर्जित करता आला, तर जी कलेची निर्मिती होते, ती अत्यंत वेगळ्या पातळीची होती. सात्त्विक होते. 

किमान अशी माझी धारणा आहे.

Comments

Popular posts from this blog

दो अंतरों के बीच में…

पीछे   रेडियो पे   गाना चल रहा है.... हाथ थे मिले की   जुल्फ   चाँद की सवार दूँ होठ   थे खुले की हर बहार को   पुकार   दूँ दर्द था दिया गया की हर दुःखी को प्यार दूँ और सांस यों की स्वर्ग भूमि पर उतार दूँ                     और   मैं   सोच रहा हूँ....                     जो यकीनन पाया उसका ,                     जो शायद पाया होगा उसका भी ,                     जो पा सकते थे... नही पाया , लेकिन उसकी   जानिब   दो कदम चले तो सही                     इसी खुशी का एहसास ,                     खुद ही खुद को , बिना-थके ,  दिलाते   रहने का ही                     जश्न मनाने के इस  ...

पं. कुमार गंधर्व आणि भा. रा. तांबे

सखोल, मूलगामी  चिकित्सा; स्वतंत्र विचार; आपण जे करतो ते ‘का’ करतो याची पक्की जाणीव; कोणत्याही प्रभावापुढे डगमगून न जाता ह्या जाणिवेवर ठाम राहण्याची ‘निर्भय साधना’; आणि ह्या सर्वांबरोबर अतिशय प्रभावी, कलात्मक व सौंदर्यपूर्ण सृजन करू शकणार्‍या; अक्षरशः एका हाताच्या बोटावर मोजता येतील अशा महान कलाकारांमधे कुमारजींचा समावेश होतो. त्यांच्या सर्वस्पर्शी व्यासंगाला आणि कुतुहलाला कोणताही विषय वर्ज्य नव्हता. कुमारजींच्या प्रत्येकच प्रस्तुतीत त्यांच्या ह्या सर्वस्पर्शी व्यासंगाचे दर्शन व्हायचे. विषयवस्तूची मांडणी साकल्याने, सर्व बाजूंनी विचार करून केलेली असायची. त्यात वर्षानुवर्षे गृहित धरलेल्या विचारांना छेद देऊन, अतिशय आनंददायक असा नवा विचार देण्याचे सामर्थ्य होते. ह्या सामर्थ्यामुळेच कुमारांचे रसिकांच्या मनात एकमेवाद्वितीय असे स्थान आहे. त्यांनी लोकांसमोर मांडलेले कवी-दर्शनाचे कार्यक्रमही ह्याला अपवाद नव्हते. कुमारजींनी भारतीय परंपरेतील अनेक कवींच्या रचना रसिकांपुढे सादर केल्या. ह्यात अनेक संत-कवींचा समावेश होता. मात्र ह्या मालिकेतील प्रत्येक संत -  कबीर, मीरा, सूरदास, तुलसीदास व तुक...