आपल्याकडे षड्दर्शनांची परंपरा आहे. त्यात आस्तिक आणि नास्तिक अशी सहा-सहा दर्शनं मानली आहेत. त्या दर्शनांमध्ये त्या काळात तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात जो सर्वोच्च विचार झाला त्याची वेगवेगळ्या दृष्टीने केलेली मांडणी आहे, त्या विचाराच्या वेगवेगळ्या पैलूंच दर्शन आहे. त्याच पद्धतीने जर हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगात स्त्री आणि पुरुषांच्या भावनिक अभिव्यक्तीच्या सर्वोच्च पातळीचं दर्शन घडविणारे सहा पुरुष आणि सहा स्त्री गायक निवडले तर? निकष अर्थातच हा, की आपल्या असामान्य अश्या अंगभूत गुणांनी, आणि अगणित कष्टांनी त्यांनी त्या क्षेत्रात सर्वोच्च असं काय करणं शक्य आहे ते आपल्या कर्तृत्वानं दाखवून दिलेलं असावं. अशी निवड करायची म्हंटलं तर पुरुष गायकांमध्ये रफी, मुकेश, किशोर, हेमंत, तलत, आणि मन्ना डे या सहा जणांचा समावेश होईल याबद्दल फारसे मतभेद असण्याचं कारण नाही – मात्र तरीही हे माझं वैयक्तिक मत आहे याचं भान मी ठेवून आहे. स्त्री गायकांमध्ये माझ्या यादीत, लता, नूरजहाँ, काननदेवी, आशा, शमशाद आणि गीता यांचा समावेश मी करेन. अर्थातच हा वैयक्तिक आवडी-निवडीचा भाग आहे, यात मतभेद असू शकतात, हे मल...
“ एअरपोर्टला जाण्यासाठीची टॅक्सी आत्ता तासभरात येईल. तू खरंच ‘आत्ता’ तिला भेटायला जाणार आहेस का ? ” मी तसा महिन्याभरातच परत येण्याच्या हिशोबानी प्रवासाला निघालो होतो. त्यामुळे अगदी तातडीनं तिला आजच भेटण्याची काही आवश्यकता होतीच असं नाही. तिचं वय खूप झालं होतं, ती थकली होती, हे खरंच.. पण मग काय झालं, महिनाभरानी भेटूच असं म्हणता आलं असतं. पण त्या दिवशी का कुणास ठाऊक, मला असं वाटलं की जाऊन यावंच. तिला भेटलो. पाऊण-एक तास छान गप्पा झाल्या. नेहमीच व्हायच्या. तिला माझ्याबद्दल असलेली माया, प्रेम, कौतुक विलक्षण होतं. ती मायाळू होतीच आणि मलाही मागच्या पिढीबद्दल खूप भावनिक जवळीक वाटते, पण त्याही पलीकडे जाऊन आम्हाला एकमेकांबद्दल वाटणारी जवळीक विलक्षण होती. आमच्या त्या शेवटच्या भेटीला उणेपुरे दोन आठवडेही झाले नसतील आणि काल ती गेली. त्या दिवशी तिला भेटायला जायची मला झालेली तीव्र जाणीव ही जणू काही नियतीच्या अटळ पावलांची माझ्या हितकर्त्या देवतांनी मला दिलेली पूर्वसूचनाच होती असं आता म्हणायला पाहिजे. माझ्या वडीलांची मोठी बहीण. त्यांच्या पिढीतल्या सहा भावंडांपैकी शेवटची शिल्लक असलेली सिंधुआत्...