Skip to main content

Posts

Showing posts from February, 2022

स्मरणशक्ती – एक चिंतन

एखादी गोष्ट, ओळ, कविता, सुभाषित किंवा इतर तपशील, स्मरणात ठेवण्याच्या आपल्या स्वतःच्या प्रक्रियेचा आपण किती वेळात जाणीवपूर्वक विचार करतो? म्हणजे ज्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात त्या ‘का’ राहतात? त्यासाठी आपण काय केलेले असते?   ते इतर गोष्टींच्या बाबतीत आपल्याला हुकमी पद्धतीने करता येऊ शकते का? येऊ शकेल का?   तसेच या उलट, ज्या गोष्टी आपली इच्छा असूनही लक्षात राहत नाहीत त्या ‘का’ राहात नाहीत? या व अशा प्रश्नांचा यात समावेश होईल माझ्या स्वतःच्या बाबतीत हा विचार करू जाता मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे जी गोष्ट लक्षात ठेवायची, त्याची काही तार्किक संगती लागल्याशिवाय ती गोष्ट माझ्या लक्षात राहात नाही. विशेषतः काव्यपंक्तिंच्या किंवा सुभाषितांच्या बाबतीत, अनेक वेळा गद्य वाक्यांच्या, थोरामोठ्यांच्या उक्तिंच्या बाबतीत सुद्धा, त्या लक्षात ठेवण्याची प्रक्रिया बहुदा पुढील प्रमाणे होते - मूळ वाचनाचा / पंक्तींचा अर्थ समजावून घेणे त्यामधील विचारांचा प्रवाह कसा वाहतो त्याचे आकलन करून घेणे त्या प्रवाहाचे जे काही नैसर्गिक विभाग होतात, ते विभाग, म्हणजेच पंक्तिंचे तुकडे समजून घेणे त...

मृत्यूचा मृत्यू

लता गेली. पण म्हणजे नेमकं काय झालं ? तिची गाणी , त्यातून तिने निर्माण केलेलं विश्व तसच आहे ना ? ते कुठेच गेलं नाहीए. जाणारही नाहीए. हवी तेव्हा ती गाणी ऐकता येणारच आहेत की? त्यात तिचा तोच सूर , तीच आर्तता , तोच नेमकेपणा , तीच जादू , तेच संगीत , तोच नॉस्टॅल्जिया असणार आहे. तिची ‘नवीन’ गाणी ऐकायला मिळणार नाहीत म्हणायची तर तिने गाणं थांबवून आता उणीपुरी वीस वर्षं होत आली होती. म्हणजे तिच्या जाण्याने नवीन चांगली गाणी आता येणार नाहीत असंही नाही. बरं , वैयक्तिक ऋणानुबंध म्हणाल तर तोही नाही. प्रत्यक्ष परिचय नाही. कधी कुठे एकत्र काम केलय असही नाही. मग लता ‘गेली’ म्हणजे नेमकं काय झालं ? ही बातमी ऐकल्यावर नि:शब्द , सुन्न होण्यासारखं नेमकं काय घडलंय ? तिच्या जीर्ण झालेलं शरीरानं आणखी किती वर्षं तग धरायला हवा होता ? ‘ वासांसि जीर्णानि...’ हे तिच्या बाबतीत खरं नाही का ? की कुणाच्याही मृत्यूने होते तशी आपल्या स्वत:च्या मर्त्यपणाची जाणीव याही मृत्यूने आपल्याला झाली इतकंच ? ❖❖❖ इयत्ता नववीत असताना मी व मा‍झ्या आतेभावाने जुनी गाणी ऐकायला व जमवायला सुरुवात केली. तेव्हापासून पुढची अनेक ...

Death of a death

Lata is   gone . But what does it mean? Her songs, the universe she weaved through them, is still here, isn’t it? It is not going anywhere. Her songs are available to us to listen to them, whenever we wish. They will have the same sur, intensity, precision, magic, music, and nostalgia they always had. It is not about her 'new' songs either. She had stopped singing for almost two decades now. So, it is not that we were going to miss 'new' songs sung by her. It is also not about any personal connections. We were not acquainted with each other. We never worked together on any project. So,  what does  'gone'  mean? Why should the news of her passing make me speechless, vacant, barren, desolate? How long was her withered body supposed to hold on? Does  Vasaansee jeerNaane   not apply to her? Or is it that her death only reminds me of my own mortality, just as the death of anyone else would? Is that all? ***********************************************************...